रस्ते विकास योजना २००१-२०२१ मधील रस्त्यांचे नकाशे
शासकिय व अर्धशासकिय कार्यालयाचे अग्नि सुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण , इतर इमारती चे अग्नि सुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण , सहपत्र - १, सहपत्र - २
अधिकार अभिलेख - ७/१२ व मालमत्ता पत्रक
आपत्ती व्यवस्थापन - दुरध्वनी क्रमांक
महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. २० ३२' ते ११ ४६' उ. आणि ७६ ३८'ते ७८ २७' पू. क्षेत्रफळ १२,६२६ चौ.किमी.; लोकसंख्या २८,८७,८२६. याच्या पश्चिमेस अकोला व बुलढाणा;उत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड, बेतूल व छिंदवाडा; पूर्वेस वर्धा व नागपूर आणि दक्षिणेस यवतमाळ व वाशीम हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात उत्तरेस मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि दक्षिणेस दर्यापूर, अमरावती व चांदूर असे सहा तालुके आहेत. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १९३ किमी. व दक्षिणोत्तर रुंदी १४५ किमी. आहे. महाराष्ट्राच्या ३.९७ टक्के क्षेत्रफळ व ३.०५ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.
प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात.
मेळघाट दर्शन |




